कृषी बातम्यासरकारी योजनाबाजारभावयशोगाथाहवामानस्पेशल स्टोरी
Advertisement

Shetmal Bajar Bhav: कापसाचे दर स्थिर, सोयाबीनच्या बाजारात नरमाई, तर मुगाचे दर दबावात.. व्यापाऱ्यांचा अंदाज काय?

05:03 PM Feb 27, 2025 IST | Krushi Marathi
bajar bhav

Maharashtra Bajar Bhav:- गवारच्या बाजारभावात सध्या स्थिरता पाहायला मिळत आहे. बाजारात गवारची आवक मर्यादित असूनही चांगला उठाव असल्यामुळे दर टिकून आहेत. राज्यातील सर्वच बाजारांमध्ये गवारची आवक कमी दिसत आहे, त्यामुळे इतर भाजीपाल्याच्या तुलनेत गवारचे भाव राखले गेले आहेत. सध्या गवारला सरासरी ५ हजार ते ६ हजार रुपयांचा दर मिळत आहे. व्यापारी व अभ्यासकांच्या मते, पुढील काही आठवडे गवारची आवक सरासरीच राहील आणि परिणामी दरही स्थिर राहतील.

Advertisement

केळीच्या दरात काहीसा चढउतार

Advertisement

दुसरीकडे, केळीच्या दरात काहीसे चढ-उतार दिसत आहेत. मागील आठवड्यात केळीच्या बाजारभावात प्रतिक्विंटल १०० ते २०० रुपयांची घट झाली. याचे मुख्य कारण म्हणजे केळीची बाजारातील वाढती आवक आणि फळबाजारात द्राक्षे, चिकू, कलिंगड यांसारख्या फळांची काढणी सुरू झाल्याने ग्राहकांची पसंती विभागली जात आहे. सध्या केळीला सरासरी २ हजार ते २१०० रुपयांचा दर मिळत आहे. व्यापारी आणि अभ्यासकांच्या मते, केळीच्या दरात पुढील काही काळ चढ-उतार कायम राहण्याची शक्यता आहे.

मुगाच्या दरांवर दबाव

Advertisement

मुगाच्या बाजारात सध्या काहीसा दबाव जाणवत आहे. देशभरातील बाजारात मुगाची आवक कमी झाली असली तरी यंदा उत्पादन आणि आयात मोठ्या प्रमाणावर वाढल्याने दरावर परिणाम झाला आहे. सध्या मुगाला सरासरी ६५०० ते ७५०० रुपयांच्या दरम्यान बाजारभाव मिळत आहे. मात्र, हा दर हमीभावाच्या तुलनेत कमीच आहे. अभ्यासकांच्या अंदाजानुसार, पुढील काही आठवड्यांपर्यंत मुगाच्या दरावर दबाव राहू शकतो, त्यामुळे शेतकऱ्यांनी बाजारातील बदलांवर लक्ष ठेवावे.

Advertisement

सोयाबीनच्या दरात नरमाई

सोयाबीनच्या बाजारात नरमाई दिसून येत आहे. प्रक्रिया उद्योगांनी सोयाबीन खरेदीचे दर ४२५० ते ४३०० रुपयांच्या दरम्यान स्थिर ठेवले होते, परिणामी बाजार समित्यांमधील दर ३७०० ते ४००० रुपयांच्या दरम्यान राहिले. सध्या सोयाबीनची बाजारातील आवक स्थिर असल्याने मोठ्या प्रमाणावर दरात चढ-उतार होण्याची शक्यता कमी आहे. अभ्यासकांच्या मते, येत्या काळातही सोयाबीनच्या दरात स्थिरता राहू शकते.

कापसाच्या बाजारभावात सुधारणा

कापसाच्या बाजारभावात काहीशी सुधारणा झाली आहे. सध्या कापसाची बाजारातील सरासरी आवक एका लाख गाठींच्या आसपास आहे. महाशिवरात्रीमुळे अनेक बाजार समित्यांमध्ये व्यवहार बंद होते, मात्र खेडा खरेदी आणि जिनिंगच्या पातळीवर काही प्रमाणात खरेदी झाली.

सध्या कापसाला ७ हजार ते ७३०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. देशभरातील बाजारात कापसाची आवक कमी होत असल्याने दराला काहीसा आधार मिळत आहे. अभ्यासकांच्या मते, कापसाची आवक मार्च महिन्यात आणखी घटू शकते, त्यामुळे भविष्यात दरात वाढ होण्याची शक्यता आहे.

या सर्व घडामोडींमुळे शेतकऱ्यांनी आपल्या मालाच्या विक्रीबाबत सतर्क राहण्याची गरज आहे. बाजारातील चढ-उतारांचा अंदाज घेत योग्य वेळी विक्री केल्यास अधिक फायदा होऊ शकतो.

Next Article