कृषी बातम्यासरकारी योजनाबाजारभावयशोगाथाहवामानस्पेशल स्टोरी
Advertisement

Maharashtra Bajarbhav Today : तुरीचा बाजारभाव टिकून; जाणून घ्या कापूस, सोयाबीनचे आजचे बाजारभाव

08:38 PM Feb 10, 2025 IST | krushimarathioffice

Maharashtra Bajarbhav Today : बाजारात सध्या विविध शेतमालाच्या दरांमध्ये चढ-उतार पाहायला मिळत आहेत. तूर, कापूस, सोयाबीन, मिरची आणि गवार यासारख्या प्रमुख शेतमालाच्या दरांवर अनेक घटकांचा परिणाम होत आहे. तुरीचा बाजारभाव स्थिर असला तरी काही पिकांचे दर हमीभावापेक्षा कमी झाले आहेत.

Advertisement

तुरीच्या दरात मोठी घट

तुरीच्या बाजारभावात मागील काही काळात मोठी नरमाई पाहायला मिळाली. सध्या तुरीला ६,९०० ते ७,३०० रुपये प्रति क्विंटल दर मिळत आहे. हमीभावापेक्षा कमी दर मिळत असल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंता आहे. काही ठिकाणी आगाप लागवडीची तूर बाजारात विक्रीसाठी आली असली तरी त्याची आवक अजूनही कमी आहे. मात्र, पुढील काळात आवकेचा दबाव वाढण्याची शक्यता असल्याने तुरीच्या दरात आणखी घसरण होण्याची शक्यता आहे.

Advertisement

सोयाबीनच्या भावात घसरण

सरकारने हमीभावाने सोयाबीन खरेदी थांबवल्यानंतर सोयाबीनच्या दरात घट पाहायला मिळाली.

कापसाचे दर स्थिर

देशातील कापसाच्या बाजारभावात सध्या स्थिरता आहे.

Advertisement

मिरचीच्या दरात मोठी घट

मागील वर्षी मिरचीच्या दरात मोठी तेजी होती. २०२३ मध्ये मिरचीचा भाव २५,००० रुपये प्रति क्विंटल पर्यंत गेला होता. मात्र, जानेवारी २०२४ पासून या दरात मोठी घट पाहायला मिळाली.

Advertisement

गवारचे दर टिकून

गवार बाजारात टिकून आहे कारण त्याची मागणी तुलनेने अधिक आहे.

Tags :
Maharashtra Bajarbhav Today
Next Article