Investment Scheme: पत्नीच्या नावावर दोन लाख गुंतवा आणि 2 लाख 32 हजार मिळवा! महिलांसाठी सरकारची खास योजना
Bachat Yojana:- महिला सन्मान बचत प्रमाणपत्र (MSSC) ही केंद्र सरकारने महिलांच्या आर्थिक स्थैर्यासाठी सुरू केलेली एक विशेष योजना आहे, जी ७.५% वार्षिक व्याजदर देते आणि दोन वर्षांच्या कालावधीत १६% पर्यंत परतावा मिळवून देते. ही योजना महिलांसाठी सुरक्षित आणि हमीशीर गुंतवणुकीचा उत्तम पर्याय आहे, कारण यात सरकारची पूर्ण हमी आहे आणि कोणत्याही जोखमीशिवाय निश्चित परतावा मिळतो. नरेंद्र मोदी सरकारने २०२३ मध्ये सुरू केलेल्या या योजनेत देशातील कोणतीही महिला किंवा पुरुष आपल्या पत्नीच्या, आईच्या, बहिणीच्या किंवा मुलीच्या नावाने गुंतवणूक करू शकतात. या योजनेत गुंतवणूक करण्याची मर्यादा कमाल २ लाख रुपये आहे आणि गुंतवणुकीचे पैसे २ वर्षांनंतर व्याजासह परत मिळतात.
गुंतवणुकीचा परतावा आणि नफा
महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजनेत गुंतवणूक केल्यास दोन वर्षांच्या मुदतीनंतर गुंतवणूकदारांना चांगला परतावा मिळतो. उदाहरणार्थ, जर कोणी १ लाख रुपये गुंतवले, तर त्याला २ वर्षांनंतर १,१६,०२२ रुपये मिळतील, म्हणजेच १६,०२२ रुपये निश्चित नफा मिळेल. जर गुंतवणूक २ लाख रुपये असेल, तर परतावा २,३२,०४४ रुपये होईल, म्हणजेच ३२,०४४ रुपयांचा नफा मिळेल. इतर कोणत्याही निश्चित उत्पन्नाच्या लघु बचत योजनेत महिलांना इतका चांगला परतावा मिळत नाही.
योजना कुठे आणि कशी सुरू करता येईल?
महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजनेअंतर्गत कोणत्याही राष्ट्रीयीकृत बँकेत किंवा पोस्ट ऑफिसमध्ये खाते उघडता येते. ही प्रक्रिया अगदी सोपी असून, आवश्यक कागदपत्रे सादर करून सहज खाते उघडता येते. यामध्ये गुंतवणूक करणाऱ्या महिलांना सुरक्षित आणि पारदर्शक पद्धतीने बचत करण्याची संधी मिळते. महत्वाचे म्हणजे, गुंतवणुकीच्या रकमेवर सरकारने निश्चित परताव्याची हमी दिली असल्याने जोखमीचा कोणताही प्रश्न नाही.
योजनेत गुंतवणूक करण्याची अंतिम मुदत
महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजनेत गुंतवणुकीसाठी ३१ मार्च २०२५ ही अंतिम तारीख आहे. म्हणजेच, १ एप्रिल २०२५ नंतर या योजनेत नव्याने गुंतवणूक करता येणार नाही. त्यामुळे महिलांनी किंवा त्यांचे कुटुंबीयांनी वेळ न घालवता या योजनेत गुंतवणूक करणे फायद्याचे ठरेल.
महिलांसाठी फायदेशीर योजना
ही योजना महिलांसाठी दीर्घकालीन सुरक्षित बचतीचा उत्तम पर्याय आहे. पारंपरिक गुंतवणूक योजनांपेक्षा ही योजना चांगली आहे, कारण त्यात व्याजदर जास्त आहे आणि मुदत पूर्ण झाल्यावर चांगला परतावा मिळतो. सध्या अनेक महिलांकडून या योजनेला चांगला प्रतिसाद मिळत असून, सरकारकडे योजनेचा कालावधी वाढवण्याची मागणी होत आहे. महिलांनी आपले आर्थिक स्थैर्य मजबूत करण्यासाठी आणि भविष्यासाठी आर्थिक सुरक्षा निर्माण करण्यासाठी ही संधी नक्कीच वापरून पाहावी.