कृषी बातम्यासरकारी योजनाबाजारभावयशोगाथाहवामानस्पेशल स्टोरी
Advertisement

महाराष्ट्रात हवामानात बदल ! काही भागांत ढगाळ वातावरण... जाणून घ्या आठवड्याचा अंदाज

01:56 PM Feb 02, 2025 IST | krushimarathioffice
Havaman Andaj

Maharashtra Weather : महाराष्ट्रात पुढील काही दिवस हवामानात चढ-उतार जाणवणार आहेत. राज्यभरात हवेचा दाब साधारण १०१० हेप्टापास्कल राहणार असून काही ठिकाणी आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. किमान तापमानात २ अंश सेल्सिअसने वाढ होईल, त्यामुळे थंडीच्या तीव्रतेत घट होईल.

Advertisement

काही भागांत ढगाळ वातावरणाची शक्यता

विशेषतः विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळच्या वेळेस हवामान थंड आणि कोरडे राहील, तर दुपारच्या वेळी उन्हाची तीव्रता जाणवेल. त्यामुळे शेतीसाठी पाण्याची गरज वाढू शकते.

Advertisement

पिकांवर हवामानाचा प्रभाव

सध्याचे हवामान गहू, हरभरा, मोहरी, सूर्यफूल या पिकांसाठी उपयुक्त ठरणार आहे. ऊस शेतीसाठीही वातावरण अनुकूल आहे. मात्र, ढगाळ हवामानामुळे काही पिकांवर कीड व रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी योग्य ती काळजी घ्यावी.

कोकण आणि उत्तर महाराष्ट्रातील तापमान

कोकणातील रायगड, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि पालघर जिल्ह्यांत कमाल तापमान ३२ ते ३३ अंश सेल्सिअस राहील. तर किमान तापमान १८ ते २१ अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता आहे. उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, धुळे, नंदुरबार आणि जळगाव जिल्ह्यांत कमाल तापमान ३२ ते ३३ अंश सेल्सिअस राहील, तर किमान तापमान १२ ते १३ अंश सेल्सिअस असेल.

Advertisement

मराठवाडा आणि विदर्भात थंडीचा प्रभाव कमी

मराठवाड्यातील धाराशिव, लातूर, नांदेड, जालना आणि बीड जिल्ह्यांत कमाल तापमान ३३ ते ३४ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान १४ ते १६ अंश सेल्सिअस दरम्यान असेल. विदर्भात बुलडाणा, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली आणि भंडारा जिल्ह्यांत आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे.

Advertisement

शेती आणि जनावरांसाठी महत्त्वाचे उपाय

  • उन्हाळी भुईमूग, बाजरी, तीळ या पिकांची पेरणी करावी.
  • टरबूज, खरबूज, काकडी यासारख्या पिकांची लागवड पूर्ण करावी.
  • गहू आणि हरभरा पिकांना आवश्यकतेनुसार पाणी द्यावे.
  • जनावरांसाठी लाळ्या-खुरकूत रोगाचा प्रतिबंध करण्यासाठी लस टोचून घ्यावी.

राज्यात तापमान हळूहळू वाढत असून, थंडीचा प्रभाव काही प्रमाणात कमी होईल. शेतकऱ्यांनी हवामान बदलांचा विचार करून योग्य तो शेती व्यवस्थापनाचा अवलंब करावा

Tags :
maharashtra weather
Next Article