Farmer Scheme: अपघात झाला? चिंता नको! सरकार तुमच्या पाठीशी उभ.. मिळणार लाखोंची मदत
Shetkari Yojana:- शेतकऱ्यांना शेती करताना अनेक नैसर्गिक आणि अपघाती संकटांना सामोरे जावे लागते. काही वेळा शेतीतील कामे करत असताना होणाऱ्या दुर्घटनांमुळे गंभीर दुखापत होते, तर काही प्रसंगी अपघाती मृत्यू होतो. अशा कठीण परिस्थितीत शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदतीची नितांत आवश्यकता असते. याच उद्देशाने राज्य सरकारने गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना सुरू केली आहे.
योजनेची सुरुवात आणि उद्देश
ही योजना 2015-16 पर्यंत अस्तित्वात होती, परंतु त्यामध्ये काही त्रुटी आढळल्याने ती बंद करण्यात आली होती. नंतर 2023 मध्ये राज्य सरकारने ही योजना सानुग्रह अनुदान तत्वावर सुधारित स्वरूपात पुन्हा सुरू केली. योजनेच्या माध्यमातून शेतीशी संबंधित अपघातांमध्ये मृत्यू झाल्यास किंवा गंभीर अपंगत्व आल्यास शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना तातडीने आर्थिक मदत मिळते.
2024-25 आर्थिक वर्षासाठी मंजूर निधी
राज्य सरकारने 2024-25 या आर्थिक वर्षासाठी या योजनेसाठी 40 कोटी 1 लाख 32 हजार रुपयांचा निधी मंजूर केला आहे. याआधीच 2024-25 च्या अर्थसंकल्पात 30 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. आता उर्वरित निधीसाठीही मंजुरी देण्यात आली आहे.
योजनेचे लाभ आणि मदतीचे स्वरूप
या योजनेतून अपघाती मृत्यू किंवा गंभीर दुखापत झालेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबांना आर्थिक मदत दिली जाते.
अनुदानाचे स्वरूप
अपघाती मृत्यू झाल्यास – २ लाख रुपये
पूर्ण अपंगत्व आल्यास – १ लाख रुपये
अर्धांगवायू (Partial Disability) झाल्यास – ५०,००० रुपये
कोणत्या अपघातांना संरक्षण मिळते?
या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना खालील प्रकारच्या अपघातांमध्ये सुरक्षा कवच मिळते –
शेतीच्या कामादरम्यान वीज पडणे
पुरामुळे मृत्यू किंवा गंभीर दुखापत
सर्पदंश किंवा विंचूदंश,विजेचा धक्का बसणे
रस्ते अपघात किंवा इतर शेतीशी संबंधित अपघात,इतर कोणत्याही नैसर्गिक किंवा मानवनिर्मित कारणामुळे मृत्यू किंवा गंभीर जखम
योजनेचा लाभ कोण घेऊ शकतो?
ही योजना महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांसाठी लागू आहे.लाभ मिळवण्यासाठी शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांनी अपघात घडल्यानंतर लवकरात लवकर आवश्यक कागदपत्रांसह अर्ज सादर करावा लागतो.
योजनेसाठी अर्ज कसा करावा?
जिल्हा कृषी अधिकारी किंवा तालुका कृषी अधिकारी कार्यालयात जाऊन अर्ज भरावा.
आवश्यक कागदपत्रांसह (अपघाताचा अहवाल, आधार कार्ड, जमीन धारक प्रमाणपत्र, शेतकऱ्याचे बँक खाते तपशील इत्यादी) अर्ज सादर करावा.मंजुरीनंतर लाभार्थ्याच्या बँक खात्यात थेट आर्थिक मदत जमा केली जाते.
शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा
राज्य सरकारच्या या निर्णयामुळे शेतीतील अपघातांमुळे होणाऱ्या आर्थिक संकटाचा भार काही प्रमाणात हलका होणार आहे. शेती हा आपल्या देशाचा कणा आहे आणि शेतकऱ्यांचे संरक्षण करणे हे सरकारचे कर्तव्य आहे. ही योजना शेतकऱ्यांना अधिक सुरक्षितता आणि आधार देण्यास मदत करेल.