For the best experience, open
https://m.krushimarathi.com
on your mobile browser.

Property Law: लहान भावाला शेतजमीन वाटणीचा पहिला हक्क मिळतो?.. जाणून घ्या शेतजमीन वाटणीच्या परंपरा आणि कायदा

02:29 PM Feb 19, 2025 IST | Krushi Marathi
property law  लहान भावाला शेतजमीन वाटणीचा पहिला हक्क मिळतो    जाणून घ्या शेतजमीन वाटणीच्या परंपरा आणि कायदा
shetjamin vaatnai
Advertisement

Shetjamin Vaatni:- गावागावात शेतीच्या वाटणीवरून अनेकदा वाद-विवाद होतात. कोणाला चांगला हिस्सा मिळतो, कोणाला कमी अनुकूल भाग मिळतो, यावरून कुरबुरी होत असतात. काही कुटुंबांमध्ये ही भांडणे आयुष्यभर टिकतात. मात्र, शेतीच्या वाटणीसाठी काही कायदेशीर मार्गदर्शक तत्त्वे आणि प्रचलित परंपरा आहेत का? कोणत्या आधारावर जमीन विभागली जाते? याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊया.

Advertisement

शेतीच्या मालकी हक्काची वाटणी कशी होते?

Advertisement

वडिलोपार्जित जमीन भाऊ-बहिणींमध्ये वाटताना तिचे समान भाग केले जातात. मात्र, पारंपरिक रितीनुसार लहान भावाला प्रथम वाटा उचलण्याचा मान दिला जातो आणि त्यानंतर क्रमाक्रमाने इतर भावांना त्यांच्या वाट्याचा भाग दिला जातो. शेवटी, मोठ्या भावाला उरलेला भाग दिला जातो. ही प्रथा सामाजिक संकेत म्हणून अनेक ठिकाणी मान्य केली जाते, परंतु तिचा कायदेशीर आधार नाही.

Advertisement

वडिलोपार्जित घराचे वाटप कसे होते?

Advertisement

फक्त शेतीच नव्हे, तर पूर्वजांकडून मिळालेल्या घराचेही वाटप हाच परंपरेचा नियम धरून केले जाते. संपूर्ण घराच्या समान हिस्से करण्यात येतात आणि सर्वात आधी लहान भाऊ आपला वाटा निवडतो. मात्र, याबाबत कोणताही लिखित किंवा कायदेशीर नियम अस्तित्वात नाही. ही प्रथा केवळ एक परंपरा असून ती बंधनकारक नाही.

Advertisement

परंपरा कायदेशीर आहे का?

भारतीय कायद्यानुसार, हिंदू उत्तराधिकार कायदा (Hindu Succession Act, 1956) वडिलोपार्जित मालमत्तेच्या वाटणीसाठी स्पष्ट मार्गदर्शक तत्त्वे देतो. या कायद्यानुसार, सर्व कायदेशीर वारसांना – मग ते भाऊ असोत किंवा बहिणी – समान अधिकार असतो. जमीन किंवा घराच्या वाटणीबाबत कोणत्याही व्यक्तीला विशेषाधिकार देण्याचा कायद्यात कोणताही उल्लेख नाही. त्यामुळे लहान भावाला पहिल्या निवडीचा हक्क आहे, ही संकल्पना कायदेशीरदृष्ट्या ग्राह्य नाही.

महाराष्ट्रातील स्थानिक पद्धती आणि प्रथा

महाराष्ट्रात, विशेषतः सातारा, सांगली आणि कोल्हापूर या भागांमध्ये मोठ्या भावाला जमिनीचा उजवा भाग मिळावा, अशी परंपरा आहे. मात्र, ही फक्त सामाजिक प्रथा असून ती कायदेशीर नाही. भारतात कोणत्याही वारसाला कोणता जमिनीचा भाग मिळावा, याविषयी कोणताही ठराविक कायदा नाही. त्यामुळे प्रत्येक कुटुंब आपल्या परंपरेनुसार आणि आपसी सामंजस्याने शेती आणि घराचे वाटप करते.

वाटणीतील वाद आणि कायदेशीर उपाय

शेतीच्या वाटणीवरून अनेक वेळा भावांमध्ये वाद निर्माण होतात, जे न्यायालयापर्यंत पोहोचतात. असे वाद टाळण्यासाठी कायदेशीर मार्गाचा अवलंब करणे योग्य ठरते. काही प्रकरणांमध्ये, फक्त परंपरेच्या आधारावर शेतीचे वाटप केल्याने भविष्यात कायदेशीर गुंतागुंत निर्माण होऊ शकते. त्यामुळे भावंडांनी एकमेकांशी चर्चा करून, कायद्याचे पालन करून आणि सहमतीने निर्णय घ्यावा, असे कायद्याचे तज्ज्ञ सुचवतात.

लहान भावाला शेतीच्या वाटणीमध्ये पहिली निवड करण्याचा हक्क असतो, अशी कोणतीही कायदेशीर तरतूद नाही. ही केवळ परंपरा किंवा सामाजिक संकेत आहे. जो काही भागांमध्ये पाळला जातो.

भारतीय वारसा कायद्यानुसार, सर्व वारसांना समान अधिकार आहेत, त्यामुळे वाटणी करताना कोणालाही विशेष प्राधान्य दिले जात नाही. वाटणीसंबंधी वाद टाळण्यासाठी, कायदेशीर मार्गाने समान वाटप करणे आणि भावंडांमध्ये संवाद साधणे अधिक योग्य ठरते