बँक, एफडी किंवा विमा पॉलिसीमध्ये Nominee असणे पुरेसे नाही …महत्वाचा नियम तुम्हाला माहिती असायला हवा
Heir Property Rule:- मालमत्ता नामांकनाचा घोळ हा अनेकांना गुंतागुंतीचा वाटतो. अनेकदा असा समज असतो की विमा पॉलिसीमध्ये किंवा बँक खात्यात एखाद्याला नामांकित अर्थात नॉमिनी केले की त्या व्यक्तीला संपूर्ण हक्क मिळतो. मात्र, हे पूर्णपणे सत्य नाही. उदाहरणार्थ, जर पतीने विमा पॉलिसीमध्ये पत्नीला नामांकित केले असेल,
तरी पतीच्या मृत्यूनंतर त्या विम्याच्या रकमेवर पत्नीचा हक्क असेलच असे नाही. पतीने जर आपल्या मृत्युपत्रात पत्नीला हक्क दिला असेल, तरच तिला विम्याची रक्कम मिळेल. अन्यथा, पतीने जर आपल्या वारसांमध्ये मुलगा, आई किंवा इतर कोणाला समाविष्ट केले असेल, तर विम्याची रक्कम त्यांनाच मिळेल.
सरकार, बँका आणि विमा कंपन्या त्यांच्या ग्राहकांना खात्यांमध्ये नामांकित व्यक्तीची नोंद करण्यास सांगतात. अनेक प्रकरणांमध्ये खातेदाराच्या मृत्यूनंतर बँकेत लाखो रुपये विनादावे पडून राहतात.कारण योग्य वारस निश्चित नसतो. त्यामुळे प्रश्न पडतो की नामांकित व्यक्ती आणि उत्तराधिकारी यामध्ये काय फरक आहे? नामांकन ही केवळ एक औपचारिकता असते,
जी कोणालाही दिली जाऊ शकते. मात्र, उत्तराधिकारी हे बहुतेक वेळा कुटुंबातील सदस्य असतात. तरीही, एखादी व्यक्ती आपल्या इच्छेनुसार कुटुंबाबाहेरच्या व्यक्तीला उत्तराधिकारी बनवू शकते. मुख्य फरक असा आहे की जर नामांकन नोंदणीकृत नसेल, तर बँक कोणालाही आपोआप नामांकित घोषित करू शकत नाही. मात्र, मृत्युपत्र नसतानाही, कायदेशीर वारस म्हणजे पत्नी, मुले किंवा आई यांना मालमत्तेचा वारसा घेण्याचा अधिकार असतो.
याबाबत असलेले महत्त्वाचे कायदे
जर एखाद्या व्यक्तीने मृत्युपत्र न बनवता निधन केले, तर त्याची संपत्ती विविध कायद्यांनुसार विभागली जाते. हिंदू उत्तराधिकार कायदा १९५६ नुसार, मुलगा, मुलगी, पत्नी/पती आणि आई हे प्रथम श्रेणीचे वारस मानले जातात. वडील, नातवंडे, भाऊ-बहिणी यांना दुसऱ्या श्रेणीत स्थान दिले जाते. मुस्लिम वारस शरीयत कायदा १९३७ नुसार ठरवले जातात, तर ख्रिश्चन समाजासाठी भारतीय उत्तराधिकार कायदा १९२५ लागू होतो, ज्यानुसार पती, पत्नी आणि मुले हे प्रमुख वारस मानले जातात.
नामनिर्देशित व्यक्ती ही केवळ एका विशिष्ट उद्देशाने निवडली जाते. ती व्यक्ती कायदेशीर वारस नसते, तर केवळ त्या संपत्तीची जबाबदारी तात्पुरती पार पाडते. उदाहरणार्थ, जर मालमत्ता मालकाने मृत्यूपत्र न बनवता निधन केले, तर त्याच्या वारसांचे नाव निश्चित होईपर्यंत व्यवहार करण्याची जबाबदारी नॉमिनी व्यक्तीवर असते. लोक अनेकदा कुटुंबातील सदस्यांनाच नामांकित करतात. तरीही, नामांकनाचे उद्दिष्ट काय आहे, याकडे लक्ष द्यावे लागते.
मुदत ठेव (एफडी), जमिनीचे कागदपत्रे आणि विमा पॉलिसी हे कुटुंब, बँक आणि सरकारी कार्यालयांमध्ये सुरक्षित ठेवले जातात. मात्र, काही वेळा ही माहिती गोपनीय ठेवली जाते. अनेकदा लोक स्वतःच्या किंवा प्रियजनांच्या सुरक्षिततेसाठी ती गुप्त ठेवतात, जेणेकरून आर्थिक लोभामुळे कुटुंबातील कोणीही अनावश्यक दबाव टाकू नये. त्यामुळे बँक किंवा वित्तीय संस्थांमध्ये उत्तराधिकारीऐवजी नामनिर्देशित व्यक्तीचे नाव नोंदवले जाते.
प्रत्येक व्यक्तीला शेवटच्या क्षणी योग्य वारस निश्चित करायचा असतो, जेणेकरून त्याच्या कष्टाची कमाई योग्य व्यक्तीला मिळेल. पण दैनंदिन जीवनात अनेक छोट्या-मोठ्या व्यवहारांसाठी नॉमिनीची निवड करणेही गरजेचे आहे. जर एखाद्या व्यक्तीने मृत्यूपत्र तयार केले नसेल, तरी नॉमिनीच्या सहाय्याने व्यवहार सुरळीत राहतात. त्यामुळे नामांकनाचा उपयोग तात्पुरत्या स्वरूपात आर्थिक व्यवहार हाताळण्यासाठी केला जातो.परंतु अंतिम मालकी हक्क कायद्याने ठरलेल्या वारसांनाच मिळतो.