कृषी बातम्यासरकारी योजनाबाजारभावयशोगाथाहवामानस्पेशल स्टोरी
Advertisement

मुंबई कोस्टल रोडचा विस्तार होणार! अडीच तासांचा प्रवास अवघ्या 35 मिनिटात, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा, वाचा डिटेल्स

07:13 PM Nov 14, 2024 IST | Krushi Marathi
Mumbai News

Mumbai News : गेल्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्रात संपूर्ण देशात रस्ते विकासाच्या अनेक प्रकल्पांची कामे पूर्ण झाली आहेत. अनेक मोठमोठ्या महामार्गांची कामे पूर्ण झालीत. यामुळे रस्ते वाहतूक आधीच्या तुलनेत अधिक मजबूत झाली असून त्यामुळे देशाच्या एकात्मिक विकासाला चालना मिळत आहे. खरे तर कोणत्याही विकसित देशात तेथील रस्ते, इन्फ्रास्ट्रक्चर, रेल्वे, कनेक्टिव्हिटी महत्त्वाची भूमिका निभावत असतात.

Advertisement

हेच कारण आहे की विकसित भारताचे स्वप्न आपल्या डोळ्यापुढे ठेवून 2014 मध्ये सत्तेत आलेल्या मोदी सरकारने रस्ते रेल्वे इन्फ्रास्ट्रक्चरच्या कामांवर अधिक जोर दिला आहे. मुंबईमध्ये देखील रस्ते विकासाची अनेक कामे गेल्या काही वर्षांमध्ये पूर्ण झाली असून अजूनही अनेक कामे सुरू आहेत.

Advertisement

तसेच भविष्यात आणखी काही कामे सुरू होणार आहेत. अशातच राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि वर्तमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईकरांसाठी एक मोठी घोषणा केली आहे. कोस्टल रोड विस्ताराबाबत त्यांनी मोठी घोषणा केलीय. ते म्हणाले की, मुंबईतील नरिमन पॉइंटपासून निर्माणाधीन कोस्टल रोडचा विस्तार मुंबई महानगर प्रदेशाचा भाग असलेल्या पालघर जिल्ह्यातील विरारपर्यंत केला जाईल.

हा विस्तारित कोस्टल रोड प्रकल्प पूर्ण झाला की नरिमन पॉइंट ते विरार हा प्रवास फक्त 35 ते 40 मिनिटात होऊ शकेल अशीही माहिती फडणवीस यांनी दिली आहे. सध्या नरिमन पॉईंट ते विरार या प्रवासासाठी मुंबईकरांना अडीच तासांचा वेळ लागतोय.

Advertisement

मात्र भविष्यात जेव्हा कोस्टल रोडचा विस्तार होईल तेव्हा हा प्रवास पस्तीस ते चाळीस मिनिटात पूर्ण होणार असल्याने प्रवाशांचा बहुमूल्य वेळ वाचणार आहे आणि इंधनाच्या खर्चात देखील मोठी बचत होणार आहे. यासंदर्भात अधिक माहिती देताना फडणवीस यांनी, कोस्टल रोड विरारपर्यंत विस्तारण्यासाठी जपान सरकार 54,000 कोटी रुपये देणार आहे.

Advertisement

वर्सोवा ते मढ लिंकची निविदा यापूर्वीच काढण्यात आली आहे. मढ ते उत्तन लिंकचे काम आता सुरू होत आहे. कोस्टल रोड हा मुंबईच्या पश्चिम किनाऱ्यावरील 8-लेन, 29.2 किमी लांबीचा वेगळा एक्स्प्रेस वे आहे जो दक्षिणेकडील मरीन लाइन्स ते उत्तरेकडील कांदिवली यांना जोडतो.

त्याचा पहिला टप्पा, 11 मार्च 2024 रोजी उद्घाटन होणार आहे, हा प्रिन्सेस स्ट्रीट फ्लायओव्हर ते वांद्रे-वरळी सी लिंकच्या वरळीच्या टोकापर्यंत 10.58 किमीचा आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 11 मार्च रोजी दक्षिण मुंबईतील वरळी आणि मरीन ड्राइव्ह दरम्यानच्या कोस्टल रोडच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन केले आणि त्याला अभियांत्रिकी चमत्कार म्हटले.

पहिल्या टप्प्यात 12 मार्च रोजी 10.5 किमी लांबीचा रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आलाय. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे काम 13 ऑक्टोबर 2018 रोजी सुरू झाले आणि त्याचा अंदाजे खर्च 12,721 कोटी रुपये आहे. पहिल्या दिवशी 16,000 हून अधिक वाहनांनी रस्त्याचा वापर केला.

वांद्रे ते विरारला जोडणाऱ्या सी लिंकला एमएमआरडीएने मंजुरी दिली आहे. कोस्टल रोड वसई-विरारपर्यंत वाढवायचा आहे. वर्सोवा-विरार सी लिंक एमएमआरडीएकडून बांधण्यात येत आहे. अंदाजे 63000 कोटी रुपये खर्चून 43 किमी उन्नत रस्ता बांधण्यात येणार आहे.

Tags :
Devendra FadnavisMumbaiMumbai Coastal RoadMumbai Coastal Road Projectmumbai news
Next Article