कृषी बातम्यासरकारी योजनाबाजारभावयशोगाथाहवामानस्पेशल स्टोरी
Advertisement

मुंबईकरांसाठी खुशखबर ! 2025 मध्ये शहरातील ‘हा’ महत्त्वाचा मेट्रो मार्ग सर्वसामान्यांसाठी खुला होणार

09:39 PM Dec 10, 2024 IST | Krushi Marathi
Mumbai Metro News

Mumbai Metro News : मुंबईमधील नागरिकांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार शहरातील एक महत्त्वाचा मेट्रो मार्ग लवकरच मुंबईकरांच्या सेवेत दाखल होणार आहे. कुलाबा ते सिप्झ या भुयारी मेट्रो-3 मार्ग संदर्भात एक नवीन अपडेट हाती आले आहे.

Advertisement

खरे तर या मार्गाचा पहिला टप्पा ऑक्टोबर 2024 मध्ये सर्वसामान्यांसाठी खुला करण्यात आला. यानंतर आता या मार्गिकेतील दुसरा टप्पा अर्थातच बीकेसी ते कफ परेड हा टप्पा सर्वसामान्यांच्या सेवेत लवकरच दाखल होणार अशी शक्यता आहे.

Advertisement

या मार्गातील दुसऱ्या टप्प्यातील रुळाचे काम 100 टक्के पूर्ण झाले असून हा मार्ग सर्वसामान्य मुंबईकरांच्या सेवेत येत्या काही महिन्यांनी दाखल होणार असून यामुळे मुंबईकरांचा प्रवास हा वेगवान होणार आहे.

पुढील वर्षी अर्थातच 2025 मध्ये मेट्रो 3 ची संपूर्ण मार्गिका सुरू होण्याची शक्यता आहे. जुन ते जुलै 2025 दरम्यान मेट्रोचा संपूर्ण मार्ग मुंबईकरांच्या सेवेत येणार असा दावा मीडिया रिपोर्ट मध्ये केला जातोय.

Advertisement

या मेट्रो मार्गाचा जो पहिला टप्पा सुरू झाला त्या पहिल्या टप्प्यात दहा स्थानके होती. संपूर्ण मेट्रो मार्गावर एकूण 27 स्थानके आहेत यामुळे आता दुसऱ्या टप्प्यात सतरा स्थानके असणार आहेत.

Advertisement

कुलाबा-वांद्रे-सीप्झ हा संपूर्ण मेट्रो मार्ग 33.5 किलोमीटर लांबीचा असून या मार्गाचा दुसरा टप्पा 20.9 किलोमीटर लांबीचा असून यावर एकूण 17 स्थानके आहेत. या मार्गावरील रुळाची उभारणी करण्याचे काम पूर्ण झाले आहे. दुसऱ्या टप्प्यातील आरे हे स्थानक सोडता बाकी सर्व स्थानके अंडरग्राउंड म्हणजेच भूमिगत राहणार आहे.

कफ परेड , विधान भवन , चर्चगेट मेट्रो , हुतात्मा चौक, सीएसएमटी मेट्रो, काळबादेवी, गिरगाव, ग्रॅण्टरोड , मुंबई सेन्ट्रल, महालक्ष्मी , नेहरू विज्ञान केंद्र, आचार्य अत्रे चौक, वरळी, सिध्दीविनायक, दादर, शितळादेवी मंदिर, धारावी, बिकेसी, विद्यानगरी, सांताक्रुज, विमानतळ, आंतरराष्ट्रीय विमानतळ, मरोळ नाका, एमआयडीसी, सिप्झ, आरे ही या मार्गावरील स्थानकं असतील.

या मेट्रो मार्ग प्रकल्पामुळे मुंबईच्या वाहतूक व्यवस्थेत एक नवीन क्रांती पाहायला मिळणार आहे. मुंबईकरांना वाहतूक कोंडीतून या प्रकल्पामुळे मोठ्या प्रमाणात दिलासा मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

Tags :
mumbai metro news
Next Article