कृषी बातम्यासरकारी योजनाबाजारभावयशोगाथाहवामानस्पेशल स्टोरी
Advertisement

Heatwave Alert: हवामान बदलामुळे महाराष्ट्रातील उन्हाळा आणखी प्रखर? उन्हाळा अधिक तापतदायक होणार? काय म्हणतात तज्ञ?

11:34 AM Mar 03, 2025 IST | Krushi Marathi
heatwave

Maharashtra Havaman:- यंदा देशातील अनेक भागांमध्ये उन्हाळा अधिक तीव्र जाणवणार असून महाराष्ट्रामध्येही तापमान वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. मार्च महिन्यात तापमान सातत्याने वाढत राहील आणि काही भागांमध्ये उष्णतेच्या लाटा जाणवतील. शनिवारी अकोला येथे राज्यातील सर्वाधिक कमाल तापमान ३८.५ अंश सेल्सिअस नोंदवले गेले,

Advertisement

ज्यामुळे पुढील काही आठवडे उन्हाचा प्रभाव अधिक जाणवेल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. हवामान विभागाचे अतिरिक्त महासंचालक डॉ. डी. एस. पै यांनी मार्च ते मे दरम्यान तापमान सरासरीपेक्षा जास्त राहील, अशी माहिती दिली आहे. विशेषतः उन्हाळ्याची तीव्रता वाढत असल्याने नागरिकांनी सावधगिरी बाळगण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

Advertisement

मार्च महिन्यात वाढणार तापमान

यंदाच्या फेब्रुवारी महिन्यात सरासरीपेक्षा अधिक तापमान नोंदले गेले असून, १९०१ पासूनच्या नोंदीनुसार तो सर्वाधिक उष्ण फेब्रुवारी ठरला आहे. यंदा फेब्रुवारी महिन्यातील सर्वाधिक किमान तापमान १५.२ अंश सेल्सिअस होते, जे यापूर्वी २०१६ मध्ये १४.९१ अंश सेल्सिअस होते. ही वाढती तापमानाची प्रवृत्ती लक्षात घेतल्यास, मार्च महिन्यात उष्णतेचा प्रभाव अधिक तीव्र असण्याची शक्यता आहे. मार्चच्या पहिल्या दिवशीच तापमान वाढ झाल्याचे निरीक्षण करण्यात आले असून, पुढील काही दिवसात उन्हाचा कडाका वाढत जाईल.

Advertisement

देशातील इतर राज्यातील हवामानाचा अंदाज

Advertisement

हवामान विभागाच्या अंदाजानुसार महाराष्ट्रासह राजस्थान, गुजरात, हरियाणा, पंजाब, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल, ओडिशा, छत्तीसगड, तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि कर्नाटकमध्ये उष्णतेच्या लाटा जाणवण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातील नागपूर, अकोला, अमरावती, औरंगाबाद, नाशिक आणि पुणे या भागांमध्ये तापमान झपाट्याने वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विदर्भ आणि मराठवाडा या भागांत उष्णतेचा प्रभाव अधिक तीव्र राहू शकतो.

सकाळी आणि रात्री तापमान तुलनेने कमी राहील, परंतु दुपारच्या वेळेस उन्हाचा तडाखा अधिक तीव्र होईल. नागरिकांनी स्वतःचे आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी उन्हात अनावश्यक बाहेर जाणे टाळावे, पुरेसे पाणी प्यावे, हलके आणि सैलसर कपडे घालावेत तसेच शरीराला थंडावा मिळेल अशा उपाययोजना कराव्यात. उष्णतेच्या लाटेमुळे आरोग्यावर परिणाम होऊ शकतो, त्यामुळे विशेषतः लहान मुले, वृद्ध आणि आरोग्यदृष्ट्या संवेदनशील व्यक्तींनी अधिक काळजी घेण्याची गरज आहे. वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर हवामान विभागाच्या सूचना आणि अंदाजांकडे लक्ष देऊन आवश्यक ती खबरदारी घेणे अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे.

Next Article