कृषी बातम्यासरकारी योजनाबाजारभावयशोगाथाहवामानस्पेशल स्टोरी
Advertisement

शेतकऱ्यांसाठी खुशखबर ! विहीर अनुदान योजनेत पुन्हा एकदा मोठा बदल, अनुदान झाली इतकी वाढ ! वाचा सविस्तर

08:09 PM Nov 05, 2024 IST | Krushi Marathi
Farmer Scheme

Farmer Scheme : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाच्या माध्यमातून विविध योजना राबवल्या जात आहेत. उत्पादन वाढावे या अनुषंगाने राज्यातील शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाच्या माध्यमातून विविध बाबींसाठी अनुदान उपलब्ध करून दिले जाते.

Advertisement

विहिरीसाठी देखील राज्यशास्त्राकडून अनुदान दिले जात आहे. राज्यातील शेतकऱ्यांसाठी सुरू असणाऱ्या एका महत्वाच्या विहीर अनुदान योजनेत सरकारने नुकताच मोठा बदल केला आहे.

Advertisement

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबर योजने अंतर्गत शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या विहीर अनुदानातं भरीव वाढ करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. आधी या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना फक्त अडीच लाख रुपयांचे अनुदान दिले जात होते.

मात्र आता अनुदानाची रक्कम तब्बल दीड लाख रुपयांनी वाढवण्यात आली आहे. अर्थातच विहिरीसाठी राज्यातील शेतकऱ्यांना चार लाख रुपयांचे अनुदान दिले जात आहे. हेच कारण आहे की आता या योजनेला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र पाहायला मिळतय.

Advertisement

दुसरीकडे राज्य शासनाने अनुदानात वाढ करण्याचा निर्णय घेतला असल्याने शेतकऱ्यांच्या माध्यमातून शासनाच्या या निर्णयाचे कौतुक केले जात आहे. कृषी क्षेत्रातील जाणकारांनी देखील राज्य शासनाचा हा निर्णय शेतकऱ्यांसाठी फायदेशीर असल्याचे मत व्यक्त केले आहे.

Advertisement

अनुदानाची रक्कम तर वाढवण्यात आलीच आहे शिवाय या योजनेअंतर्गत ज्या जटील अटी होत्या त्या देखील आता शिथिल करण्यात आल्या आहेत. तसेच, या योजनेत नवीन तीन बाबींचा समावेश केला आहे. राज्य शासनाने या योजनेसाठी लागू असणाऱ्या 2 अटी रद्द केल्या आहेत. आधी विहिरींमध्ये ५०० फूट अंतर असावे अन वार्षिक उत्पन्न दीड लाख रुपये असावे या दोन अटी होत्या.

पण आता या अटी रद्द केल्या आहेत. त्यामुळे लाभार्थी संख्या वाढणार असा विश्वास व्यक्त होऊ लागला आहे. आता आपण या योजनेतून कोणकोणत्या बाबींसाठी किती अनुदान मिळणार याबाबत माहिती पाहणार आहोत.

किती अनुदान मिळणार?
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना ही राज्यातील अनुसूचित जाती/नव बौद्ध समाजातील शेतकऱ्यांसाठी सुरू करण्यात आली आहे. या योजनेचा लाभ राज्यातील सर्वच शेतकऱ्यांना मिळत नाही.

फक्त अनुसूचित जाती प्रवर्गातील शेतकऱ्यांना याचा लाभ मिळतो. या योजनेअंतर्गत आधी विहिरीसाठी अडीच लाखांचे अनुदान होते मात्र आता विहिरीसाठी चार लाख रुपयांचे अनुदान मिळणार आहे. या अंतर्गत नवीन विहीर खोदण्यासाठी तर अनुदान मिळतेच शिवाय इतरही काही बाबींसाठी या योजनेअंतर्गत अनुदान देण्याचे तरतूद आहे.

महत्वाचे म्हणजे या योजनेच्या सर्वच बाबींच्या अनुदानात वाढ करण्यात आली आहे. या अंतर्गत आता विहीर दुरुस्त करण्यासाठी १ लाख, शेततळे प्लास्टिक अस्तरीकरणसाठी २ लाख, इनवेल बोअरिंगसाठी ४० हजार, वीज जोडणी आकारसाठी २० हजार, पंप संचसाठी ४० हजार, ठिबक सिंचनसाठी ९७ हजार,

तुषार सिंचनसाठी ४७ हजार एवढे अनुदान दिले जाणार आहे. तसेच नव्याने समावेश केलेल्या पीव्हीसी पाइपसाठी ५० हजार, यंत्रसामग्रीसाठी ५० हजार अन परसबागसाठी ५ हजार अनुदान दिले जाणार आहे.

Tags :
Farmer Scheme
Next Article