For the best experience, open
https://m.krushimarathi.com
on your mobile browser.

शेतकऱ्यांना अच्छे दिन येणार ! खात्यात जमा होणार 15 लाख रुपये, मोदी सरकारची भन्नाट योजना; कोणाला मिळणार लाभ ?

11:22 AM Oct 09, 2024 IST | Krushi Marathi
शेतकऱ्यांना अच्छे दिन येणार   खात्यात जमा होणार 15 लाख रुपये  मोदी सरकारची भन्नाट योजना  कोणाला मिळणार लाभ
Farmer Scheme
Advertisement

Farmer Scheme : अलीकडेच केंद्र सरकारने पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा अठरावा हप्ता पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला आहे. या अंतर्गत 9.4 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात प्रत्येकी 2000 रुपयांचा हप्ता जमा झाला आहे. यामुळे देशभरातील कोट्यावधी शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसत आहे.

Advertisement

मात्र, मोदी सरकारच्या माध्यमातून फक्त पीएम किसान सन्मान निधी योजनाच राबवली जाते असे नाही तर इतरही अनेक योजना आहेत ज्या मोदी सरकारने आपल्या कार्यकाळात सुरू केले आहेत.

Advertisement

अशीच एक योजना FPO योजना. फार्मर प्रोड्यूसर ऑर्गनायझेशन म्हणजेच एफ पी ओ ही योजना शेतकऱ्यांना व्यापारी बनवण्यासाठी सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यावर १५ लाख रुपये एकरकमी पाठवले जातात.

Advertisement

मात्र याचा लाभ हा वैयक्तिक शेतकऱ्याला मिळत नाही. अर्थातच ही वैयक्तिक लाभाची योजना नाहीये. या योजनेचा लाभ हा शेतकरी गटाला दिला जातो. यासाठी 11 शेतकऱ्यांची एक कंपनी स्थापन करावी लागते.

Advertisement

FPO योजना जुनी असली तरी माहितीअभावी लोकांना त्याचा लाभ घेता येत नाहीये. अशा परिस्थितीत आज आपण या योजनेची थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

Advertisement

कसे आहे या योजनेचे उद्दिष्ट?

शेतकऱ्यांना व्यवसायाशी जोडण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने एफपीओ योजना सुरू केली होती. जेणेकरून शेतकऱ्यांनाही जास्त पैसे मिळू शकतील. या योजनेच्या माध्यमातून शेतकरी समूहाला व्यवसाय सुरू करण्यासाठी शेतकऱ्यांना 15 लाख रुपयांचे कर्ज देण्याची तरतूद करण्यात आली होती.

मात्र हे कर्ज वैयक्तिक शेतकऱ्याच्या खात्यात जमा होणार नाही. तर हे पैसे 11 शेतकऱ्यांच्या नोंदणीकृत कंपनीच्या संयुक्त खात्यात जमा होणार आहेत. पण या योजनेंतर्गत मिळालेले पैसे सरकारला परत पाठवावे लागत असल्याचा दावा सूत्रांनी केला आहे.

कारण शेतकऱ्यांना एफपीओ योजनेत रस नाही. योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर 11 शेतकऱ्यांचा गट तयार करावा लागेल. एवढेच नाही तर सर्वांच्या संमतीनंतर या 11 शेतकऱ्यांनी शेतीशी संबंधित व्यवसायाचा प्रस्ताव तयार करून तो विभागाकडे पाठवला आहे.

त्यानंतर, विभागाने कंपनी आणि शेतकऱ्यांची सत्यता तपासल्यानंतर, सरकार त्यांच्या संयुक्त खात्यावर 15 लाख रुपये पाठवते. जर तुमची कंपनी वाढली तर सरकार तुम्हाला योजनेअंतर्गत सबसिडी देखील देते. लक्षात ठेवा हे सरकारने दिलेले कर्ज आहे. जे सुलभ हप्त्यांमध्ये भरावे लागेल.

अर्ज कुठं करावा लागणार?

योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला राष्ट्रीय कृषी बाजाराच्या अधिकृत वेबसाइट https://www.enam.gov.in ला भेट द्यावी लागेल. यानंतर, होम पेजवर FPO पर्यायावर क्लिक करा. आता 'Registration' या पर्यायावर क्लिक करा.

यानंतर, उघडलेल्या नवीन पेजवर संपूर्ण तपशील भरा. यानंतर तुम्ही पासबुक किंवा रद्द केलेला चेक आणि आयडी प्रूफ स्कॅन करून अपलोड करा. ही सर्व कामे पूर्ण केल्यानंतर फॉर्म सबमिट करा. त्यानंतर तुमच्याशी वैयक्तिक संपर्क साधून पुढील कारवाई केली जाईल.

Tags :