कृषी बातम्यासरकारी योजनाबाजारभावयशोगाथाहवामानस्पेशल स्टोरी
Advertisement

📢 शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी ! आता ‘Farmer ID’ शिवाय अनुदान आणि कर्ज मिळणार नाही ! बनवा या सोप्या स्टेप्स फॉलो करा...

09:21 AM Feb 03, 2025 IST | krushimarathioffice

महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांसाठी शेतकरी ओळखपत्र (Farmer ID) अनिवार्य केले आहे. यामुळे पीएम-किसान, पीक विमा आणि इतर शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी ओळखपत्र असणे अत्यावश्यक ठरणार आहे. यासंदर्भात अनेक शेतकऱ्यांना प्रश्न पडले आहेत. त्यामुळे शेतकरी ओळखपत्र म्हणजे काय? ते का गरजेचे आहे? आणि ते कसे मिळवायचे? या सर्व शंका दूर करण्यासाठी 10 महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे खाली दिली आहेत.

Advertisement

1) शेतकरी ओळखपत्र म्हणजे काय?

हे एक डिजिटल ओळखपत्र आहे, जे शेतकऱ्याच्या आधार कार्डला त्यांच्या जमिनीच्या नोंदींशी जोडते. हा सरकारच्या डिजिटल कृषी अभियानाचा (Agri Stack) महत्त्वाचा भाग आहे.

Advertisement

2) शेतकरी नोंदणी म्हणजे काय?

ही सरकारी प्रणाली आहे, ज्या अंतर्गत शेतकरी आणि त्यांच्या जमिनीची संपूर्ण माहिती नोंदवली जाते. यामुळे सरकारला योजनांची अचूक अंमलबजावणी करण्यास मदत होते.

3) शेतकरी ओळखपत्राची गरज काय?

4) शेतकरी ओळखपत्र सर्वांसाठी बंधनकारक आहे का?

होय! हे आता अनिवार्य आहे. शेतकरी ओळखपत्राशिवाय कुठल्याही सरकारी कृषी योजनांचा लाभ घेता येणार नाही.

Advertisement

5) शेतकरी ओळखपत्र कसे बनवायचे?

शेतकऱ्यांनी https://hrfr.agristack.gov.in या संकेतस्थळावर जाऊन ऑनलाइन अर्ज करावा. तसेच, ग्रामपंचायत स्तरावरही अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध आहे.

Advertisement

6) शेतकरी ओळखपत्राचा उपयोग कसा होईल?

7) कोणत्या राज्यांमध्ये योजना लागू आहे?

सध्या गुजरात, मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशमध्ये याचा पायलट प्रोजेक्ट सुरू आहे. तसेच, आसाम, छत्तीसगड आणि ओडिशा येथे याची चाचणी चालू आहे.

8) शेतकरी ओळखपत्रासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत?

आधार कार्ड
आधारशी लिंक असलेला मोबाईल नंबर
जमिनीच्या मालकीचा दस्तऐवज
शेतकऱ्याची प्रत्यक्ष उपस्थिती अनिवार्य आहे.

9) शेतकरी ओळखपत्राचे फायदे कोणते?

वारंवार ई-केवायसी करण्याची गरज नाही.
डिजिटल KCC द्वारे बँकेतून ₹5 लाखांपर्यंत कर्ज मिळू शकते.
पीक विमा आणि शासकीय अनुदान पारदर्शक पद्धतीने मिळेल.
सरकारी योजनांचा लाभ थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचेल.

10) शेतकरी ओळखपत्रासाठी अर्ज कुठे करावा?

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी https://hrfr.agristack.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ऑनलाइन अर्ज भरावा.

शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाचा सल्ला!

तुमचे शेतकरी ओळखपत्र लवकरात लवकर तयार करा.
योजना, अनुदान आणि कर्जासाठी पात्र होण्यासाठी हे अत्यंत महत्त्वाचे आहे.
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी अधिकृत पोर्टलवरच माहिती भरा, कोणत्याही बनावट वेबसाइटवर विश्वास ठेवू नका!

Next Article