For the best experience, open
https://m.krushimarathi.com
on your mobile browser.

EPFO च्या नव्या नियमामुळे कर्मचाऱ्यांना दिलासा! आता 50 हजार रुपयांचा किमान विमा प्रत्येक कर्मचाऱ्याला उपलब्ध.. जाणून घ्या महत्वाचे निर्णय

08:27 AM Mar 06, 2025 IST | Krushi Marathi
epfo च्या नव्या नियमामुळे कर्मचाऱ्यांना दिलासा  आता 50 हजार रुपयांचा किमान विमा प्रत्येक कर्मचाऱ्याला उपलब्ध   जाणून घ्या महत्वाचे निर्णय
epfo rule
Advertisement

EPFO New Rule:- कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) आपल्या नियमांमध्ये अनेक महत्त्वपूर्ण सुधारणा करत कोट्यवधी कर्मचाऱ्यांना अधिक फायदेशीर सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. विशेषतः, डिपॉझिट लिंक इन्शुरन्स स्कीम (EDLI) संदर्भात मोठे बदल करण्यात आले असून, यामुळे कामगारांच्या कुटुंबीयांना अधिक सुरक्षितता मिळणार आहे. याअंतर्गत, जर एखाद्या सदस्याचा मृत्यू त्याच्या नोकरीच्या कालावधी पूर्ण होण्याआधी झाला, तर त्याच्या कुटुंबाला 50,000 रुपयांपर्यंतचा विमा लाभ मिळेल.

Advertisement

यापूर्वी, जर एखाद्या सदस्याने दीर्घकाळ योगदान दिले नसेल किंवा मृत्यूसमयी तो सेवेत नसल्यास, त्याच्या कुटुंबाला हा लाभ मिळत नसे. मात्र, नव्या नियमांनुसार, शेवटच्या अंशदानाच्या 6 महिन्यांपूर्वी सदस्याचा मृत्यू झाला असला, तरी तो जर नियोक्त्याच्या यादीत असला, तर त्याच्या कुटुंबाला EDLI योजनेचा फायदा मिळू शकतो. या सुधारणेमुळे दरवर्षी किमान 14,000 पेक्षा अधिक कुटुंबांना थेट

Advertisement

कर्मचाऱ्यांच्या सेवेच्या बाबतीत केला बदल

Advertisement

आर्थिक मदत मिळण्याची शक्यता आहे. याशिवाय, सेवेच्या सातत्याशी संबंधित आणखी एक मोठा बदल करण्यात आला आहे. पूर्वी, जर एखाद्या सदस्याने नोकरी बदलली आणि दोन नोकऱ्यांमधील कालावधी काही दिवसांचा असला, तरी त्याच्या सेवेतील सातत्य खंडित झालं मानलं जात असे, त्यामुळे तो EDLI च्या संरक्षणापासून वंचित राहू शकत होता.

Advertisement

मात्र, नव्या नियमानुसार, एका नोकरीतून दुसऱ्या नोकरीत जाण्यासाठी जास्तीत जास्त दोन महिन्यांपर्यंतचा कालावधी असल्यास तो सेवेतील सातत्य मान्य केला जाणार आहे. याचा थेट फायदा असा होईल की, एखाद्या कर्मचाऱ्याला जर नोकरी बदलल्यानंतर काही काळ नवीन रोजगार नसेल आणि त्या दरम्यान त्याचा मृत्यू झाला, तरी त्याच्या कुटुंबाला EDLI योजनेचा विमा मिळू शकतो.

Advertisement

या बदलामुळे अंदाजे 1,000 हून अधिक प्रकरणांमध्ये दरवर्षी सकारात्मक परिणाम होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर, EDLI योजनेअंतर्गत मिळणाऱ्या विम्याची रक्कम 2.5 लाखांपासून 7 लाख रुपयांपर्यंत आहे, त्यामुळे सदस्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदतीचा मोठा आधार मिळू शकतो.

व्याजदरामध्ये कुठलाही बदल नाही

या व्यतिरिक्त, कर्मचारी भविष्य निधी संघटनेनं (EPFO) आपल्या व्याजदरांमध्ये कोणताही बदल न करता त्यांना स्थिर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे, ज्यामुळे पेन्शनधारक आणि भविष्य निर्वाह निधीमध्ये गुंतवणूक करणाऱ्या सदस्यांना दीर्घकालीन फायदे मिळतील. एकंदरीत, या नव्या सुधारणा कर्मचारी हितासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असून, त्यामुळे कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक स्थिरता आणि सुरक्षिततेचा मोठा फायदा मिळणार आहे.